नितेशने जपून बोलावे ; बोलताना भान ठेवून बोललं पाहिजे - राणेंचा भावाला सल्ला

Admin
नितेशने जपून बोलावे ; बोलताना भान ठेवून
बोललं पाहिजे - राणेंचा भावाला सल्ला

मुंबई : हॅलो प्रभात 
धाराशिव जिल्ह्यात भाजपच्या मेळाव्यात बोलताना शिवसेनेवर राणेंनी जोरदार टीका केली.  नितेश राणे म्हणाले, 'सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा.' त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. पुढे ते असेही म्हटले , 'कोणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसेही नाचले तरी देशात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत.' यावरती विरोधक टीका करत असतानाच आता नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनी आपल्या भावाला  सल्ला दिला आहे.


निलेश यांनी सोशल मिडिया एक्सवरती पोस्ट लिहली आहे, पोस्टमध्ये, नितेशने जपून बोलावे... मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे. पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही - निलेश राणे


Join Our WhatsApp Group 

Tags
To Top