टीम इंडियाला मोठा धक्का..! या स्टार फलंदाजाची इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीतून तडकाफडकी माघार

Admin

 
टीम इंडियाला मोठा धक्का..!
या स्टार फलंदाजाची इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीतून तडकाफडकी माघार

मुंबई : डिजिटल हॅलो प्रभात

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच  सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. अशातच आता टीम इंडियाला मोठा धक्का बसलेला आहे. भारताचा स्टार फलंदाज तसेच टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या पाच  सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून माघार घेतली आहे. भारतीय क्रिकेट नियमन मंडळाने (बीसीसीआय) माहिती दिली आहे. 

बीसीसीआयने सांगितले की, विराट कोहलीने बीसीसीआयला वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेण्याची विनंती केली आहे. विराटने कर्णधार रोहित शर्मा, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांशी चर्चा केली आहे. देशाचे प्रतिनिधित्व करणे हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिल यावर कोहलीने भर दिला.

बीसीसीआयची विनंती : 'विराटच्या गोपनीयतेचा आदर करा'
बीसीसीआयने म्हटले आहे की, बीसीसीआय त्याच्या निर्णयाचा आदर करते. बोर्ड आणि संघ व्यवस्थापनाने स्टार फलंदाजाला पाठिंबा दिला आहे आणि उर्वरित संघाकडून कसोटी मालिकेत कौतुकास्पद कामगिरी करण्याचा पूर्ण विश्वास आहे. 'बीसीसीआय मीडिया आणि चाहत्यांना विनंती करते की विराट कोहलीच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि त्याच्या वैयक्तिक कारणांबद्दल अंदाज लावू नये. आगामी कसोटी मालिकेत खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करायला हवे. 


पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.
Tags
To Top