गव्याच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार

Admin
गव्याच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार

राधानगरी : हॅलो प्रभात
कुदळवाडी येथील शेतकरी भिकाजी गुंडू बेरकळ हे आपल्या कडक नावाच्या शेताकडे गेले असता या ठिकाणी दबा धरून बसलेल्या गव्याने त्यांच्यावरती हल्ला चढवत जोरदार धडकेने त्यांना जागीच ठार केले .ही धडक इतकी जोरदार होती की अवघ्या काही मिनिटातच उपचारापूर्वीच त्यांचा जागीच मृत्यू झाला . वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ धाव घेत पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मुक्तदेह पुढे पाठवला .


आपटाळ पैकी कुदळवाडी (ता.राधानगरी) येथील भिकाजी गुंडू बेरकळ (वय ६५) हे शेतीच्या कामासाठी व पिकांना पाणी देण्यासाठी आपल्या शेताकडे चालले होते.दरम्यान कडक नावाच्या शेताजवळ येताच ,या ठिकाणी दबा धरून बसलेल्या गव्याने त्यांना कांही कळण्याच्या आत त्यांच्यावर हल्ला केला व जोरदार धडक दिली.ही धडक इतकी जोरदार होती की, गव्याची शिंगे त्यांच्या उजव्या बाजूच्या बरगडीत घुसली. छातीवर जोरदार धडक बसल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. व अवघ्या कांही मिनिटातच त्यांचा जागीच मृत्यू झाला .

म्हासुर्ली वनक्षेत्राचे वनपाल विश्वास पाटील यांची बदली झाली असतानाही जबाबदारीच्या भावनेतुन या अधिकाऱ्याने कळे येथून थेट कुदळवाडी चा प्रवास करत पंचनामा प्रक्रियेत सहभाग घेऊन नोकरीतून समाज भावना दाखवून दिली.
Join Our WhatsApp Group 


घटनेची फिर्याद गावचे पोलीस पाटील बळासो पाटील यांनी राधानगरी पोलीस ठाणे व वनविभाग राधानगरी यांना दिली . कांही वेळातच या ठिकाणी म्हासूर्ली परिक्षेत्राचे वनपाल संग्राम जितकर,सरवडे वनपाल संजय भाट,वनरक्षक मनीषा ऱ्हायकर, नंदकुमार खराडे, अशोक संकपाळ,वनमजूर जैनुल जमादार ,ज्योतीराम कवडे,धोंडीराम सुतार यांच्यासह राधानगरी रेस्क्यू टीमचे सर्व कर्मचारी उपस्थित झाले . व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय राधानगरी कडे पाठवला .

शासन नियमाप्रमाणे मिळणारा मोबदला सदर पिडीत कुटुंबीयांपर्यंत लवकरात लवकर पोहचवण्यासाठी योग्य ते सहकार्य करू.
-विशाल पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी, राधानगरी


To Top