![]() |
सांगली : हॅलो प्रभात
शामरावनगर येथे प्रस्तावित दफनभूमीच्या जागेवर सध्या अडीच फूट पाणी भरले आहे. पावसाळ्यात चार ते पाच फूट पाणी असते. या जागेच्या खरेदीचा व्यवहार संशयास्पद आहे. जागा मालकांना भरपाईची रक्कम देण्यासाठी घाईगडबड झालेली आहे. याप्रकरणी श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी हिंदू एकता आंदोलनचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली आहे.
शिंदे म्हणाले, शामरावनगर येथील दफनभूमीसाठी आरक्षित असलेली जागा वादग्रस्त आहे. मूळ जागा मालकांनी प्लॉट पाडून विक्री केलेली आहे. पाहणी न करता जागा अधिग्रहणापोटी १९ कोटी रुपये संबंधित जागा मालकाच्या नावावर वर्ग केले आहेत. या प्रकाराची चौकशी व्हावी, श्वेतपत्रिका काढावी असेही शेवटी शिंदे म्हणाले. .
![]() |
Join Our WhatsApp Group |