यवलूज जि. प. मतदारसंघात विश्वासाचा कौल ; दिलीप पाटीलांचे जनतेशी नातं, पूजा पाटील यांचा विजय अटळ

Admin
यवलूज जि. प. मतदारसंघात विश्वासाचा कौल
दिलीप पाटीलांचे जनतेशी नातं, पूजा पाटील यांचा विजय अटळ

पन्हाळा : हॅलो प्रभात (पांडुरंग फिरींगे )
यवलूज जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या जी चर्चा सुरू आहे, ती कोणत्याही जाहिरातीची देण नाही, ना कुठल्या दबावाची. ही चर्चा आहे लोकांच्या मनातून उमटलेली, अनुभवातून आलेली आणि विश्वासातून घडलेली आणि त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत  पूजा दिलीप पाटील. या चर्चेचं मूळ आहे दिलीप पाटील यांचं निःस्वार्थ समाजकार्य. गावातील मंदिर बांधकामासाठी तब्बल २० लाख रुपयांचा स्वतःच्या खिशातून केलेला खर्च, गरजू लोकांना वेळोवेळी दिलेली मदत, अडचणीत असलेल्या कुटुंबांसाठी उभा राहण्याची भूमिका हे सगळं कुठल्याही प्रसिद्धीशिवाय सुरू राहिलं.


ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पदाधिकारी असोत वा सामान्य नागरिक समाजातील गरजू लोकांच्या कामासाठी पाठपुरावा करणे, त्यांची कामे मार्गी लावणे, हा दिलीप पाटील यांचा स्वभावच राहिला आहे. म्हणूनच आज लोक ठामपणे सांगतात 'हा नेता नाही, हा आमच्यातलाच माणूस आहे.' गावातील प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता असताना, दोन शिक्षकांना स्वतःच्या खिशातून पगार देण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. शिक्षण थांबू नये, मुलांचं भवितव्य अडचणीत येऊ नये, ही भावना त्यामागे होती. अशा कृतींमुळे दिलीप पाटील आज लोकांच्या मनात घर करून राहिले आहेत. याच विश्वासाचं प्रतिबिंब म्हणजे पूजा पाटील. जनसुराज्य पक्षाकडून वारंवार डावलले गेल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. हा निर्णय कुठल्याही राजकीय फायद्यासाठी नव्हता, तर काम करण्याची संधी मिळावी म्हणून होता. आणि जनतेने हा निर्णय मनापासून स्वीकारला.

पूजा पाटील

दिलीप पाटील आजही स्पष्टपणे सांगतात की, आमदार विजय कोरे यांच्याविषयी कधीही वाईट बोलणार नाही.
राजकारणात मतभेद असू शकतात, पण वैयक्तिक द्वेष नाही, हीच त्यांची भूमिका आहे. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत दिलीप पाटील म्हणतात की, बाबासाहेब पाटील यांचे उपकार कधीही विसरता येणार नाहीत. दोन वेळा संधी हुकली, पण त्यांची जिद्द कधीच कमी झाली नाही. आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. जनता स्वतः पुढे येत आहे. तरुणांची तडफदार फळी, गावागावातील कार्यकर्ते, सामान्य मतदार सगळेच एक सूर लावत आहेत. ही निवडणूक आता पक्षांची राहिलेली नाही. ही निवडणूक झाली आहे माणुसकीची, कामाची आणि विश्वासाची. लोक उघडपणे सांगत आहेत, दिलीप पाटील लोकांना आपले वाटतात, म्हणूनच त्यांची पत्नी पूजा पाटील यांचा विजय निश्चित आहे. यवलूज मतदारसंघात आज जो विश्वास दिसतो आहे, तो पाहता एकच वाक्य सर्वांच्या ओठावर आहे, यावेळी पूजा दिलीप पाटील यांचा विजय काळ्या दगडावरची रेष आहे!
To Top